आम्ही राजहौंस पक्षी सहज आलों मुंबई शहरासी ॥धृ०॥
पाहिलें स्वरूप मनोहर आंगावर ज्वार फार सजली । कोण्य़ा राजींद्राची नार बत्तीसलक्षणी कनकपुतळी ? । कशी ठुमकत चाले जपुन, गांठ आड अकस्मात पडली । चाल । सखे मर्जी आमुची आहे । त्वां धरावा आमुचा स्नेहे । मनीं नको धंरू सौंशय । सांग रंगमहालीं कधीं नेशी ? ॥१॥

तुं अगदींच दिसतीस लहान नहाण आलें वरुषा-महिन्यांत । आंगीं विषयबाण चेतला त्वरीत ते आपुल्या महालांत चाल । जीव तुजवर झाला खुशी । लागलें लक्ष तुजपाशीं । आहे ईश्वर याला साक्षी । देखिली रंभा तुज जैशी ॥२॥

या दों दिवसांचा भर निघोणी जाइल आतां सखये । भ्रंशिली मती कां तूझी ? गांठ एकांतामधीं पडु दे । जोबन खुब आले भरून नवतीचा रंग खुलुंदे । चाल । आम्ही रोखून तुजशीं थाट । नव्या रस्त्यामधीं पडली गांठ । गळ्यामधीं कंठा दुहेरी थाट । मिठी मारावी सखे तुजशीं ॥३॥

बोध जाला, चित्तापासून सखा रंगमहलीं तिनें नेला । उभतांची जाली खुशी, आनंदें विडया देती त्याला । म्हणे सखाराम राघो मुशाफर पंची समजावीला ।
चाल । ठेवावी ममता बरी । अशी माझी विनंती स्मरी । कुशा छंद गातो तरा खासी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel