श्रीब्राह्मण उवाच ।

सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च ।

देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः ॥१॥

श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी ।

तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥१६॥

तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन ।

तें स्वर्गनरकीं गा समान । नाहीं अनमान ये अर्थी ॥१७॥

भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गीं इंद्रासी ।

तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी । सूकरीपासीं निश्चित ॥१८॥

हें जाणोनि साधुजन । उभय भोगीं न घालिती मन ।

नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥१९॥

जीत सापु धरावा हातीं । हें प्राणियांसी नुपजे चित्तीं ।

तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥२०॥

जैसें न प्रार्थितां दुःख । प्राणी पावताति देख ।

तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥२१॥

मज दुःखभोगु व्हावा । हें नावडे कोणाच्या जीवा ।

तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा अदृष्टें ॥२२॥

ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा ।

यालागीं सांडूनि विषयआस्था । परमार्था भजावें ॥२३॥

केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर ।

येच निर्धारीं साचार । गुरु 'अजगर' म्यां केला ॥२४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel