ेखील या कंपनीला दिलं.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीला मिळालेलं हे पहिलं यश होतं. त्यानंतर या कंपनीची घोडदौड सुरू झाली ती आजही चालू आहे.

१९७४ साली या कंपनीने DPT हि त्रिगुणी लस तयार केली. १९८१ साली साप चावल्यानंतर प्रभावी ठरणाऱ्या लसीचं उत्पादन करण्यात आलं. १९८९ साली Measles Vaccine M-Vac चं उत्पादन करुन SIL कंपनी भारतातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी ठरली. Diphtheria, Pertussis आणि tetanus अर्थात DPT या SIL कंपनीमार्फत लसीकरण झालेल्या मुलांच प्रमाण सांगायचं झालं तर आज जगातील ३ पैकी दोन मुलांना या कंपनीने उत्पादित केलेल्या लसीमार्फत लसीकरण झालेलं आहे. DPT, M-VAC,BCG, रुबेला यांसारख्या अनेक लसी सिरम इंडिया मार्फत उत्पादित करण्यात येवू लागल्या.

आशिया खंडातील सर्वात मोठ्ठी तर जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यामधील पहिल्या तीन मध्ये असणारी कंपनी म्हणून SIL चा आज उल्लेख केला जातो.

आज त्यांचा मुलगा अधर पुनावाला कंपनीचा कारभार पाहतो. सायरस पुनावाला यांच्या उत्पनातला ९० टक्के पैसा हा याच कंपनीतून येतो. आज कंपनीची नेट व्ह्यॅल्यू आठ अब्ज डॉलर असल्याचं सांगण्यात येत. साहजिक इतक्या मोठ्या रक्कमेतून गर्भश्रीमंत असणारे सायरस पुनावाला आपले शौक पुर्ण करतात. पण त्याचबरोबरीने त्यांच्या कंपनीमुळेच भारत महामारी सारख्या रोगातून वाचला आहे.

आपल्याला जी स्वस्तात पण प्रभावी लस टोचली आहे ती यांच्याच कंपनीने टोचलेली आहे हे खूप उशीरा आपल्याला समजतं. त्यांच्या याच कार्यामुळे भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देवून गौरव केला.#285327342
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel