कामगारांची प्रचंड सभा भरली होती.

पगार झाला होता.

काही दिवस रेटणे आता शक्य होते.

पगार हाती पडल्यावर संप – असे मुद्दामच ठरवण्यात आले होते.

परवापासून संप!

चाळी-चाळींतून प्रचार होत होता.

सुंदरपुरात खळबळ होती.

सभास्थानाकडे माणसांची रीघ सुरू आहे. गाणी म्हटली जात आहेत. “हम नहीं हटनेवाले, हम हैं लढनेवाले” अशी ती गाणी होती.

आणि घना आला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बराच उशीर झाला होता, त्याने एकदम सभेला सुरुवात केली. गंभीर, पंढरी, ब्रिजलाल यांची भाषणे झाली.

इतक्यात सभेतून कोणी तरी उठून म्हटले, “मला थोडे बोलायचे आहे.”

गोंधळ सुरू झाला.

“या, तुमचे म्हणणे मांडा. येथे सर्वांच्या विचाराला वाव आहे. या. त्यांचे म्हणणे सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या.” घना म्हणाला.

तो मनुष्य आला.

वासुदेवअण्णा त्यांना म्हणत.

ते त्या जिल्ह्यातील नव्हते, दूरचे नगर-सोलापूरकडचे होते. तिकडचे काही कामगार गिरणीकामावर होते. त्यांचा संपाला थोडा विरोध होता. मालकाने कामगारांत भेदनीती अवलंबून फूट पाडायला सुरुवात केली होती. कोणी म्हणत, त्यांना संप फोडण्यासाठी पैसेही देण्यात आले होते.

वासुदेवअण्णा बोलायला उभे राहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel