आणि वधुवरे स्टेजवर आली. घना नि मालती उभी होती. मालतीचे वडील भाऊ म्हणाले, “माझी बहीण मालती व घना विवाहबद्ध होत आहेत. ईश्वर साक्षी आहेच. तुम्ही सारे सज्जन साक्षी आहात. या उभयतांना आशीर्वाद द्या. या दोघांचा संसार सुखाचा, सेवामय कृतार्थतेचा होवो.”

टाळ्यांचा कडकडाट झाला. पुष्पवृष्टी झाली. जयप्रकाश आशीर्वाद देताना म्हणाले, “येथील वसाहतीला मोहनगाव म्हणून नाव देण्यात येत आहे. गाधीजींचे नाव मोहनदास म्हणून हे नाव. त्यांच्या शिकवणीप्रमाणे तुम्ही जात आहात. देशात जातीयता आहे, तुम्ही मानवता शिकवीत आहात. देशात अन्न कमी आहे, तुम्ही रात्रंदिन श्रमून ओसाड जमीन लागवडीखाली आणीत आहात. राष्ट्राला जे जे आज हवे आहे, राष्ट्राचे जीवन अन्तर्बाह्य निरोगी नि सुखी होण्यासाठी ज्याची ज्याची म्हणून जरूर आहे, ते ते सारे तुम्ही निर्मित आहात. सहकारी शेती शेतकरी करील की नाही, कोणी शंका घेतात. येथे सक्ती न करता तुम्ही आपण होऊन तो प्रयोग करीत आहात. ज्याच कल्याण आहे, फायदा आहे, ते मनुष्य आज ना उद्या करीलच करील. आपण कर्तव्य करीत राहावे.—आणि हा सुंदर आदर्श विवाह! ना गाजावाजा, ना काही. मालती-घनश्याम! त्यांची धडपड ऐकून पवित्र वाटले. असाच प्रयोग चालवा. खरी संस्कृती निर्माण करा. जय हिंद!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel