वसंता : मला वाईट वाटत आहे.  लोक कांहींहि करोत.  मला तरी स्वत:ची फसवणूक करून चालणार नाहीं.  मी पुण्यांत जाईन. पुण्यांतील रस्त्यारस्त्यांत, गल्लीगल्लींत ओरडत जाईन.  ''धर्मावर संकट आहे.  हिंदूंनो!  उठा. अरे, घरीं काय झोपा झोडतां ?  रेडियो काय ऐकतां ?  विजेच्या पंख्यांचा वारा काय घेतां ? अरे निघा! भगवा झेंडा बोलवीत आहे.  समर्थ बोलवीत आहेत,''  अशी मी गर्जना करीन. तुम्ही हंसतांसे ? मी लहान आहें म्हणून ? लहान मुलांनींच पराक्रम केले. ध्रुव लहान होता,  रोहिदास लहान होता,  अभिमन्यु लहान होता, उपमन्यु लहान होता. हें काय हंसतांसे ?  हीं पुराणांतील नांवें म्हणून हंसतां ? रामदास लहान होते, ज्ञानदेव लहान होते, शिवाजी महाराज लहान होते, माधवराव पेशवे लहान होते, विश्वासराव लहान होते, जनकोजी लहान होते. हें काय ? तुम्हीं हंसतांसे ?  ही पूर्वजांची कीर्ति म्हणून ?  आजहि लहान मुलें पराक्रम करीत आहेत.  बाबु गेनु लहान होता, सुभान लहान होता, रामा लहान होता, तो घरून पळून गेलेला दयाराम लहान होता.  सारे लहान वीर तुरुंगांत गेले.  आम्ही देशासाठीं मुलें तुरुंगांत गेलो.  आम्ही धर्मासाठीं नाहीं का जाणार ?  माझे सारे मित्र पुन्हा नाहीं का सत्याग्रहाला येणार ?

वेदपुरुष : ह्या सत्याग्रहासाठीं येणें शक्य नाहीं. तरुण मुलें आतां असल्या गोष्टीसाठीं उठणार नाहींत. फार करून पेटणार नाहींत. तुझे मित्र तुला हंसतील; रामा, दयाराम सारे तुला हंसतील.

वसंता : कां बरे ? त्यांना का त्याग आवडतनासा झाला ? ते का संसारांत पडले, चिखलांत रुतले ? गाणेंबजावणें, खाणेंपिणें याच्या पलीकडे त्यांना नाहीं का कांहीं दिसत ? छे:! असें कसें होईल ? ते दिलदार तरुण आहेत. मी त्यांना हांका मारीन. ''सोन्यामारुतीची पूजा करूं चला सारे'' असें मी म्हणेन. ते येतील.

वेदपुरुष : ते येणार नाहींत.

वसंता : त्यांचा का देवधर्मावर आतां विश्वास नाहीं ? देव म्हणजे का ते थट्टा समजतात ? सोन्यामारुतीसमोर ते आपलें शिर नाहीं का नमविणार, आपलें शरीर नाहीं का देणार ?

वेदपुरुष : ते दुसर्‍या सोन्यामारुतींची उपासना करूं लागले आहेत.

वसंता
: कोठें आहेत ते दुसरे सोन्यामारुती ? क-हाडला का कोल्हापूरला ? नगरला का नाशीकला ? तेथेंहि का सत्याग्रह सुरू झाला आहे ? धर्मांसाठीं महाराष्ट्र, सारा महाराष्ट्र पेटत आहे, होय ना ?

वेदपुरुष : सारा महाराष्ट्रच नाहीं, सारें भरतखंड पेटत आहे.  सोन्यामारुतीची पूजा सारें जग करूं लागणार आहे. त्यांच्यासाठी हे पंधरा तीनवारांचे सत्याग्रहच नाहीं, तर प्राणांची कुरोंडी जग करणार आहे.

वसंता
: सारें जग सोन्यामारुतीची पूजा करणार ? समर्थांनी अकराशे मारुती स्थापन केले ? आतां का जगभर मारुती स्थापले जाणार ?  हिंदुधर्माचा विजय असो!

वेदपुरुष : ते येणार नाहींत.

वसंता : त्यांचा का देवधर्मावर आतां विश्वास नाहीं ? देव म्हणजे का
ते थट्टा समजतात ? सोन्यामारुतीसमोर ते आपलें शिर नाहीं का नमविणार, आपलें शरीर नाहीं का देणार ?

वेदपुरुष : ते दुसर्‍या  सोन्यामारुतींची उपासना करूं लागले आहेत.

वसंता
: कोठें आहेत ते दुसरे सोन्यामारुती ? कऱ्हाडला का कोल्हापूरला ? नगरला का नाशीकला ? तेथेंहि का सत्याग्रह सुरू झाला आहे ? धर्मांसाठीं महाराष्ट्र, सारा महाराष्ट्र पेटत आहे, होय ना ?

वेदपुरुष : सारा महाराष्ट्रच नाहीं, सारें भरतखंड पेटत आहे.  सोन्यामारुतीची पूजा सारें जग करूं लागणार आहे. त्यांच्यासाठी हे पंधरा तीनवारांचे सत्याग्रहच नाहीं, तर प्राणांची कुरोंडी जग करणार आहे.

वसंता
: सारें जग सोन्यामारुतीची पूजा करणार ? समर्थांनी अकराशे मारुती स्थापन केले ? आतां का जगभर मारुती स्थापले जाणार ? हिंदुधर्माचा विजय असो!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel