प्रवेश दहावा
(कांहीं बालवीर प्रवेश करतात.)

नायक -  आज मौज झाली कीं नाहीं ? बरेच दिवांनीं आज इतकें पोटभर खेळलों. तो पाठीवर हात मारण्याचा खेळ कसा गमतीचा आहे !

एक -  आणि कोण जास्त वेळ हंसतो ! त्यांत कशी मजा ! आपल्या शिक्षकांना तर हंसतां हंसतां पुरे झालं. हर्षवायु होण्याची वेळ आली !

दुसरा -  आतां पुन्हां केव्हां जावयाचें असेंच टेकडीवर ?

नायक -  पंधरा दिवसांनीं पद्यावतीस जावयाचें आहे. तिथं सुंदर तळें आहे, पोहण्याची मौज येईल. जंगलांत सूरपारंब्या व इतर खेळ खेळण्याचीहि गंमत येईल.

तिसरा -  ठरलें का ?

नायक -  जर तुमचं सर्वाचं ठरलं, तेवढं सूत काढून झालं असेल तर ! त्या राघू वैगरेंनी तर केव्हांच सूत काढलं. ते लोक आपल्यापेक्षां अधिक कष्टाळू असतात, यांत संशय नाही.

एक -  आम्हीहि लौकर काढूं !

नायक -  चला आतां. (बालवीर जातात.) (रस्त्यांत पाहून) आं? हें कोण इथं पडलं आहे ? (खाली वांकतो.) याला ताप आला आहे. (नीट न्याहाळून पाहातो.) अरे, हा तर नारायण ! घेरी येऊन पडला आहे कीं काय ? का करावें ? अजून बालवीर दूर गेले नसतील (शिटी फुंकतो - पांच - सहा बालवीर दौडत येतात.)  याला आपण आपल्या मंदिरांत नेऊं या. (काठीवर त्याला उचलून नेतात.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel