नल हा निषध देशाचा राजा. त्याच्या अनेक गुणांचे ऋषि बृहदश्व यांनी वर्णन केले त्यांत तो सुंदर, अश्ववेत्ता, द्यूतप्रेमी, शूर, प्रजाहितदक्ष असल्याचे म्हटले आहे. दमयंती ही विदर्भ देशाची राजकन्या रूपवान व गुणवान होती. एकमेकांचे गुण कर्णोपकर्णी एकमेकांना कळून, प्रत्यक्ष न पाहतांच ती एकमेकांच्या प्रेमांत पडलीं होतीं. प्रेमविव्हल होऊन उपवनांत बसला असतां नलाने एका सोनेरी पंखांच्या हंसाला पकडले. त्याने विनवले कीं मला जिवंत सोडलेस तर मी दमयंतीला भेटून तिच्यापाशी तुझे गुणवर्णन करीन. नलाने त्याला सोडले व हंसाने देशांतराला जाऊन दमयंतीला भेटून नलाच्या रूपगुणांचे वर्णन तिला ऐकविले. ते ऐकून दमयंतीने ’तूं नलापाशी माझे वर्णन कर’ असे हंसाला म्हटले. त्याप्रमाणे हंसाने नलाकडे परत येऊन झालेली हकीगत त्याला सांगितली. हंस हा प्रेमदूत ही कल्पना कालिदासाच्या मेघदूतासारखीच आहे. महाभारत आधीचे, तेव्हां कालिदासाने नलदमयंतीच्या कथेवरून यक्षाने मेघाला दूत करण्याची कल्पना उचलली काय़? कसेहि असले तरी दोन्ही कल्पना रम्यच हे खरे.
नलाचें हंसकृत वर्णन ऐकून दमयंतीचा प्रेमरोग बळावला! एकंदर लक्षणे पाहून तिच्या पित्याने तिचें स्वयंवर ठरवलें व सर्व राजेलोकांना आमंत्रणे धाडलीं त्यांत नलहि होताच. स्वयंवर आहे म्हटल्यावर मोठ्या आशेने नल स्वयंवराला निघाला. वाटेत काय झाले ती कथा फारच मजेशीर आहे. ती पुढल्या भागांत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel