वजगिरीचा राजा विक्रम सिंह याला पद्ममुखी नांबाची एक मुलगी होती. ती फार सुंदर होती. म्हणून तिच्याशी लम करण्यासाठी दूर दूर देशांच्या राजकुमारांनी प्रयत्न केला. त्यांत रणगिरीच्या इंद्रवर्माला विक्रमसिंहाने पसंत केले. पद्ममुखीलादि तोच राजकुमार आवडला. मुंगपुरचा राजा कालकेतु बाच्या मनांतून सुद्धा पामुखीशी लम करावयाचे होते. त्याच्या आईने त्याला सुचविले की तू विक्रमसिंहाला जाऊन भेट, बहुतेक तो तुझे म्हणणे कबूल करील. आईच्या म्हणण्याप्रमाणे कालकेतु विक्रम- सिंहाला भेटला. आपली इच्छा व्यक्त केली. परंतु विक्रमसिंहाने त्याला होकार दिला नाही. विचारा उलट्या पावली परता. तो परतल्यावर विक्रमसिंहाने इंद्रवर्माला बोला- वून त्याच्याशी पद्ममुखीचे ला ठरविले.तो आनंदाने रखगिरीस आला बलयाची तयारी करू लागला. त्याच वेळी डोगरी लोकांच्या टोळीने रखगिरीवर हल्ला केला. इंद्रवर्मानें बजगिरीच्या विक्रमसिंहाजवळ मदत मागितली. जावयाचा निरोप कळतांच राजा व त्याचा मुलगा शक्तिसिंह दोघेहि निघाले. ही बातमी शृंगपुरला पोहोचली. तेव्हा कालकेतूची आई त्याला म्हणाली-"आत्तां कजगिरीला कोणी नाही, तूं सैन्य पामुखीला पळवून आण, येथें तुम्हां दोघांचे लम लावू. तसे केलेस तरच विक्रमसिंहाचे डोळे उघङ- तील. मग बसेल तो पश्चाताप करीत." आईच्या आज्ञेप्रमाणे त्याने पडामुखीला कैद करून आणले. रत्नागिरीच्या युद्धांत विक्रमसिंह मारला गेला. इन्द्रधर्माला पदच्युत केल्यामुळे तो राज्य सोइन निघून गेला होता. ही सर्व बातमी श्रृंगपुरला पोहोचाययास मुळीच वेळ लागला नाही. इंद्रधर्माची अशी स्थिति झालेली ऐकून सर्वांना वाईट वाटले. त्यांनी विचार केला की पानुखी आतां कालकेतुशी लम करील. पण तिने नकार दिला. माझ्या वडिलांनी ज्यांना मला देण्याचे ठरविले आहे त्यांच्याशीच मी ला करीन. दुसया कोणाला हि वरण्यास मी तबार नाही." कालकेतूच्या आईने पामुखीच्या इच्छे विद्धच तिच्याशी लग्न करण्यास सांगितले. परंतु तोहि स्वाभिमानी होता. म्हणाला- "जेव्हा तिला बाटेल तेव्हांच मी लम करीन. पाई या किती दिवस अशी राहते ती." कालकेतूच्या आईनें पद्ममुखीची समजूत घालण्यासाठी रागावून, धाक दाखवून सर्व तन्हेचे प्रयत्न करून पाहिले. पण पद्ममुखीनें आपला निश्चय बदलला नाही. 'मला वाटले होते की तूं माझ्या मुलाशी लग्न करून माझी सून होऊन माझा भान राखशील. पण तुझे डोळे अजून उघडले नाहीत. ठीक आहे. रहा येथे कैवी म्हणून." आई म्हणाली.

तिने आपल्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच तिच्याकडून वेगार करून घेण्यास सुरवात केली. भांडी घासणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, राजबाडा झाडणे वगैरे कामें तिला करावी लागत. रात्री कोठेतरी ती एका कोपऱ्यांत आडवी होई. आपल्या आईचे हे कान कालकेतू व त्याची बहीण दोघांनाहि आवडले नाही. कालकेतू नेहमी आईला म्हणे "ती राजकुमारी आहे. तिला मानाने वागवण्यांतच आपला मोठेपणा आहे." 'आला आहे मोठा शहाणा, तिला वठणीवर आणाबला हाच उपाय आहे.  बघते कशी नाही कबूल होत तें. तुझ्याशी तिचे लक्ष लावूनच मी प्राण सोडीन." आईच्या ह्या बोलण्यावर कालकेतू काहीच बोळू शकला नाही. तीन वर्षे गेली. काळजीने, दुःखानें आणि कामाच्या भारानें पद्ममुखी अगदी अशक्त झाली. एक दिवस नित्याप्रमाणे पद्ममुखी कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. तिनें नदीच्या पैल तिरावर एक नाव डुलत असलेली पाहिली. कपडे धुतां घुता ती नावेकडे सारखी पाहात होती. नाव हळू हळू जवळ येत होती. थोडी जवळ आल्यावर तिला त्यांत दोन माणसें दिसली. नाव आणखी जवळ आल्यावर तिने त्या दोधा व्यक्तींना ओळखलें. एक तिचा भाऊ शक्तिसिंह होता व दुसरा मनाने बरलेला पति इन्द्रवर्मा. तिला खूप आश्चर्य वाटले व आनंदहि झाला. जर तिने त्यांना ओळखले नसते तर कदाचित त्यांची भेट झाली नसती. कारण ते तिला ओळखू शकले नव्हते. " शृंगपूर हेच का! या देशाच्या राजाचेच नांव कालकेतू नाही काय?" शक्तिसिंहाने पामुखीला विचारले, पद्ममुखीने 'हो' म्हणून सांगतांच त्याने विचारले की कालकेतूनें बजगिरीच्या राज- कुमारीला पळवून आणले होते ती जिवंत आहे काय!" तिला कालकेतूची राणी होणे पसंत नसल्याने ती राजकुटुंबाचे कपडे धुण्याचे काम सध्या करते आहे. गुलामच आहे त्यांच्या घरची." असे सांगतांना तिला गहिवरून आले. म्हणाली-“शक्ति, मला ओखळले नाहीस का रे?" आपल्या बहिणीला अशा तन्हेंनें कष्ट करीत असतांना पाहून त्याला फार वाईट बाटले, इन्द्रवर्माच्याहि बोळ्यांना पाणी आले. "तुझी भेट झाली फार चांगले झाले. रजगिरीच्या राजाने डोंगरी लोकांच्या राजाचा पराभव करून पुन्हा आपले राज्य मिळविलें आहे. इन्द्रवर्माच त्याचा राजा आहे. परंतु तुशा पत्ता लागल्याशिवाय तो राज्याभिषेक करून प्यावयास तयार नाही. आम्ही तेव्हा पासून तुझ्या शोधासाठी सारखें हिंडत आहोत.” शक्तिसिंह म्हणाला. आपण आचांच हिला आपल्या नावेत घालून घेऊन जातं." इन्द्रवर्मा म्हणाला. पण त्याला मी असा सोडणार नाही! ज्याने माझ्या बहिणीला पकडून आणून इतका त्रास दिला आहे. त्याला असें नुसते सोडीन होय? ते काही नाही. उद्या सकाळी अचानकपणे आपण किल्ल्यावर हल्ला चढवू या. इतक्या दिवस घालविलेस तसाच आजचा एक दिवस घालब, उद्या सकाळी तुझी सुटका करून घेऊन जातो." एवढे सांगून शक्ति- सिंह नाव घेऊन निघून गेला. “मो आतां एका राजपुत्राची बहीण आहे. एका राजाची बायको होणार आहे. मी आतां कपडे कशाला धुवू ?" असे समजून पद्ममुखीने सारे कपडे नदी काठींच टाकून दिले व घरी परतली. पद्ममुखीला घरी येण्यास उशीर झाला होता. अथातच म्हाताराच पित्त खवळल. ती एकदम गर्जना करून म्हणाली-“नदीवर ऐवढा वेळ लावलास तर बाकी काम केव्हां करणार! मला वाटते तुझी एकदां चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे." 'जरा तोड संभाळून बोला.” पदमुखीने जरा कठोर स्वरांत म्हटले, 'है! इतकी घमेंड! थांब तुला चाव- काचे फटकेच हवेत." असे म्हणत आईनें शिपायांना बोलाविलें. पद्ममुखी म्हणाली-“मी राणी होण्याचा काल निश्चय केलाच आहे. जर माझ्या अंगाला कोणी हात लावाल तर उद्यां चामडीच लोळवीन एकेकाची. पद्ममुखीच्या तोंडून ते शब्द ऐकतांच कालकेतूची आई फार खुश झाली. एका क्षणांत तिचा राग कोठल्या कोठे लयास गेला. हे वर्तमान तिने क्षणाचाहि विलंब न लावतां कालकेतूला कळविले. त्यालाहि फार आनंद झाला. शेवटी पामुखी माझ्यावर प्रसन्न झाली असे वाढून त्याने लमाच्या तवारीला सुरवात केली. दुसरा दिवस उजाडला. पहाटे पासूनच राजवाव्यांत धावपळ चालली होती. लामाच्या तयारीची गडबड चालू होती. इतक्यांत कांहीं सैनिक थापा टाकीत टाकीत राज- वाव्यांत आले. ते म्हणाले “बाब्यासमोर फार मोठे युद्ध चालले आहे." ते पाहून आंतले सर्व सशत्र सैनिक तिकडे गेले आहेत. हे ऐकताच अंत:पुरांतील सर्व स्त्रिया भयभीत झाल्या. हळू हळू बुद्धाचा कोलाहल जवळ ऐकू येऊ लागला. सैनिक पुन्हा पुन्हा येऊन परा- जयाची बातमी देऊन जात होते.

शेवटी तर एका सैनिकानें कालकेतू मारला गेल्याची बातमी दिली. तेव्हा मात्र त्याच्या आईचे डोळे पांढरे झाले. चेहेरा फिका पडला. ती मटकन तेथेच खाली बसली. थोड्या वेळाने एक सेनापति आला आणि म्हणाला-"आपल्यांत पनमुखी कोण आहे! महाराज शक्तिसिंहाची आज्ञा आहे की त्या व त्यांच्या दासी यांना सोडून बाकी सर्वांनी मरणास तयार व्हावें." ऐकतांच इंदुमतीने एकदां सेनापतीकडे व एकदा पममुखीकडे पाइन मान खाली घातली. पद्ममुखीने एकदा चारी बाजूस पाहिले. सर्व स्त्रियांच्या चेहेन्यावर दुःखाची छाया पसरलेली तिला दिसली. तत्क्षण ती पुढे होऊन म्हणाली- 'मीच पामुखी आहे आणि येथील पाकी सर्व स्त्रिया माझ्या दासी आहेत." ह्याचर सेनापति तिला प्रणाम करून निघून गेला. थोड्या वेळाने आणखी काही शिपाई येऊन राजमातेला व तिच्या दासींना हातकव्या पालन घेऊन गेला. काही दिवसांनी शक्तिसिंहाने आपल्या बहिणीचे व इंद्रवर्माचे मोठ्या थाटानें लग लावून दिले व इंद्रवर्माने आपला राज्याभिषेक पण करविला. त्या नंतर पद्ममुखीने इंदुमतीची आपल्या भावाला ओळख करून दिली आणि म्हणाली-“या मुलीने मला आपली बहिनी होण्यासाठी पुष्कळ सांगितले. परंतु | मला की त्रास दिला नाही. उलट माझ्याबद्दल तिला सहानुभूतीच वाटत होती. फार चांगली आहे ही. म्हणून हीच जर माझी बहिनी झाली तर मला फार आनंद होईल." शक्तिसिंहाने ती गोष्ट मान्य केल्या- वरून दोघांचे ला झाले. इंदुमति शक्ति- सिंहाची राणी झाली, पण राजमाता मात्र जन्मभर पामुखीची दासी म्हणूनच राहिली. अशा त-हेनें पप्रमुखीने आपल्याला दुःख व कष्ट दिल्याचा सूड उगवला.

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel