मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे , ही दृढ भावना ठेवावी . ‘ मी माझ्याकरता जगतो ’ असे न म्हणता ‘ रामाकरता जगतो ’ असे म्हणू या , मग रामाचेच गुण अंगी येतील . आपण प्रपंचाकरता जगतो , म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात . म्हणून भगवंताकरता जगावे . प्रपंच हे साधन आहे , परमार्थ हे साध्य आहे . प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात ; आम्ही तसा करीत नाही , म्हणून परमार्थ साधत नाही . जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत ; मनुष्यजन्म , संतसमागम , आणि मुमुक्षुत्व . मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे , विषयभोगासाठी नव्हे . परमार्थाची तळमळ लागली पाहिजे . तळमळ उत्पन्न झाल्यावर , मन शुद्ध झाल्यावर , राम भेटेलच . समई लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल . स्मरणरुपी तेल वारंवार घालावे , मग परमार्थ -दिवा कायम राहील . परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे . पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे . मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच ; निदान पाट्या तरी आढळतात . आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही , मग वाटाड्या कसा भेटणार ? परमार्थमार्गावर गुरु खास भेटेलच . म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या .

आचार आणि विचार यांची सांगड असावी . पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरुर आहे . पोथी वाचल्यानंतर , जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल . घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही . प्रथम एक रस्ता , मग दुसरा , मग तिसरा , असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो . त्याप्रमाणे , पोथीतले सगळे कळले नाही , तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या . दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू . म्हणून भगवतस्मरणाला जपले पाहिजे . त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे . संत , सदगुरु आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा . तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये . याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरुपच होईल . मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ , अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच . परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला ; उलट , प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच . संसाररुपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफोवला . हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे . खरा कर्ता ईश्वर असताना , जीव विनाकारणच ‘ मी कर्ता ’ असे मानतो . झाडाचे पान रामावाचून हलत नाही . देहाचा योगक्षेम तोच चालवितो . मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari